Thursday, October 29, 2020

वाहन उद्योगातले १९८० च्या दशकातले आवश्यक बदल. टाटा, लेलॅण्ड आयशर स्वराज वगैरे.

 १९८० च्या दशकापर्यंत भारतात टाटा आणि अशोक लेलॅण्डच्या मोठ्या (१० चाकी, २ ऍक्सल्सच्या) ट्रक्सचीच चलती होती. कमी मालाच्या वाहतुकीसाठी छोट्या ट्रकची आवश्यकता असते वगैरे कुणाच्या गावीही नव्हते.

दिल्ली क्लॉथ ऍण्ड जनरल मिल्स (DCM) ने जपानी टोयोटा सोबत भागीदारी करून छोटे ट्रक्स उत्पादनाच्या क्षेत्रात पाऊल टाकले आणि मग विविध जपानी मोटार कंपन्यांसोबत भागीदा-यांचा कालखंड सुरू झाला. स्वराज गृपने माझदा सोबत, आयशर गृपने मित्सुबिशी सोबत भागीदारी करून छोटे ट्रक्स भारतीय बाजारपेठेत बाजारपेठेत आणलेत आणि ते तंत्रज्ञान आत्मसात करून, भागीदारी संपुष्टात आली, तरी त्या ट्रक्सचे उत्पादन भारतीय रूपात सुरूच ठेवले.





त्याचा परिणाम असा झाला की हा असा पण segment बाजारात आहे याची जाणीव टाटा आणि अशोक लेलॅण्ड दोघांनाही झाली आणि मग टाटा ४०७, टाटा ७०९, टाटा ९०७ वगैरे छोटे ट्रक्स टाटाने आणलेत तर लेलॅण्डनेही इव्हेकोसोबत भागीदारी करीत छोटे ट्रक्स बाजारात उतरवलेत. आता अधिकाधिक सूक्ष्म बाजारपेठ ताब्यात घेण्यासाठी टाटा एस, लेलॅण्ड दोस्त वगैरे स्पर्धा सुरू झालीय. या स्पर्धेत आयशर, स्वराज, DCM कुठेच नाहीत. उलट आयशरने विस्तार करीत आता मोठे, २५ टनी, ४० टनी ट्रक्स बनविण्यात लक्ष घातलेय.
आज फ़क्त स्वराज गृप माझदा चे नाव लावतोय. आयशरने मित्सुबिशी चे नाव आपल्या उत्पादनांना देणे बंद केलेय. DCM टोयोटा चे नवीन ट्रक्स आताशा बाजारात येतच नाहीत. एखाद्या विदेशी कंपनीशी भागीदारी करून विदेशात चालणारी एखादी उपयुक्त कल्पना आपल्या देशाच्या भल्यासाठी आणण्याच्या काळाचे मात्र आम्ही साक्षीदार ठरलो, इतकेच.
- जपानी डोक्याचा, आपला रामोहिरो किनीसाकी

No comments:

Post a Comment