Sunday, August 16, 2026

A Railfanning session at Nagpur Jn. on 15/08/2026

I went to receive my daughter who had a short trip to Sangli and was returning by 11404 Kolhapur - Nagpur Express (Via Miraj - Pandharpur - Kurduwadi - Latur - Latur Road - Parali - Prabhani - Purna - Washim - Akola - Badnera - Wardha)

The train was expected to arrive at 12.00 noon on Platform No. 7. I reached half an hour early. Parked my car at the East gate parking. There is hardly any parking at West gate of Nagpur station. The station is getting major infrastructural modifications and hence very difficult to get a parking space there even for two wheelers.)

I checked on Railone app. 11404 had just left Borkhedi and it was another half an hour for it to reach Nagpur. I had a short railfanning session at Platform No. 7.



Pune shed WDP 4 D 40513 was running idle on the second line from Platform 7. This line is not energized by electric supply. There must be only diesel shuntings  on this line. I am surprized why this is the only line left without electric supply at Nagpur passenger yard.



This loco must have brought 12119 Amaravati - Ajni Superfast Intercity today in the morning. It will take it back today in the evening. This train shares rake with 11026 Amaravati - Pune Express (Earlier Bhusaval - Pune Express extended to Amaravati) and 12158 Pune - Solpaur Hutatma Express. The ened to end run of this train is on this WDP 4 D. I wonder why ? All the section in which the train runs is now completely electrified.


One can observe the third line from Platform No. 7 is without electric catenary. The WDP 4 D was followed by OverHead Equipment Inspection Car by Central Railway.

Just besides Platform No. 7, there was a rake of assorted coaches of various trains. It had a few coaches of 11201 / 11202 Nagpur - Shahdol Express (Via Saunsar - Chindwada - Seoni - Nainpur - Jabalpur - Katni). 11203 / 11204 Nagpur - Madgaon Express and a few parcel vans.



There was a derated WDG 3 Shakti from Kurla Shed. This loco must be getting used as a shunter in Nagpur yard now. 013620 was the road number for the loco. "0" before its number indicates that it is derated for its use only for shunting and other departmental duties now.


The rake on the 4th line from Platform 7 must be of 12136 Nagpur - Pune Express. Soon this train will get LHB rake. The old ICF rake is counting its last days on this train. I noticed some of the AC coaches in this rake are 2008 manufactured. 18 years old. There codal life must have been near end.




The rake for 11201 - 11202 Nagpur - Shahdol Express was also very old and ill maintained. Naturally. This train runs mainly through SECR but maintained at Nagpur that is CR. It should have its primary maintenance at one of the SECR destinations like Jabalpur or even Shahdol.






Made in 2010. 16 years old coach now.



The faded name plate for the comparatively new train tells all the story of its preference by maintenance staff and by CR.

And here arrives 11404 Kolhapur - Nagpur Express behind 39406 WAP 7 from Pune shed. This loco needs serious wash. This was the same rake hauled by same loco last week on Saturday when my daughter departed for Sangli by 11403 Nagpur - Kolhapur Express. I think once in a week this loco must be visiting its home shed Pune either by hauling 01024 Kolhapur - Pune Special Fare Express (Now 11024 Kolhapur - Pune Express, earlier 11023 / 11024 Kolhapur - Mumbai Sahyadri Express, closed down during CORONA period and short terminated till Pune after CORONA)


And after a week I was happy to meet with my daughter who had her first solo trip by train. The coach was 243773. 2024 manufactired Two Tier AC Sleeper coach. A-2. She had the same coach while going to Sangli by 11403 exactly a week ago. 

Somehow, I do not feel cozy in LHB coaches, especially 2 AC and 1AC of LHB are not as royal as their predecessors from ICF used to be. 3 AC coached manufactured by ICF, RCF till 1999 were simply the best. Later they were reduced to simply an AC version of second class Sleeper 3 tier coaches. 



We had a working escalator from Platform No. 7 to FOB and then we descended to Platform 8. There were announcements for 22846 Hatia - Pune Superfast Express to be arriving soon on Platform No. 8, the home platform for Nagpur Jn.

Happy Railfanning.

Saturday, August 15, 2026

परम वैभवम नेतु मे तत स्वराष्ट्रम

"इंग्रजी ही आजच्या विश्वाची ज्ञानभाषा आहे" हे गोंडस आणि तितकच लंगड समर्थन करीत करीत आपण आपल्या पुढल्या पिढीला जबरदस्ती इंग्रजी माध्यमातून शिकवले.


१. मग जर्मनी, जपान इत्यादी देश इंग्रजीवाचून अज्ञानीच राहिलेत अशी आपली समजूत आपण अधोरेखित करतोय.


२. मराठी माध्यमात (किंवा तेलुगू, तामिळ, हिंदी, कन्नड इ. भारतीय भाषा माध्यमात) शिकलेले माझे बंधू, अनेक मित्र गेली अनेक वर्षे युरोप आणि अमेरिकेत अक्षरशः राज्य करताहेत, त्यांचे काहीच अड्ले नाही हो. त्यांनी आपली मातृभाषा तर प्राथमिक शिक्षणात उत्तम आत्मसात केली आणि गरज पडेल तेव्हा इंग्रजीही उत्तम आत्मसात केली.


३. याउलट प्राथमिक शिक्षणापासूनच इंग्रजीचे हे जोखड मानेवर घेऊन फिरणारी आजची लहान पिढी, "सत्तेचाळीस म्हणजे फोर्टी सेव्हन, तेवीस म्हणजे ट्वेंटी थ्री" अशा  केविलवाण्या समजावणीला सामोरे जाताहेत आणि "ना इधरके रहे ना उधरके रहे हम" ही अवस्था पावतात, हे आजचे दुर्दैवी वास्तव आहे.


बर ते जाऊद्या, तो आजचा मुद्दाच नाही. आपण इंग्रजी भाषा शिकताशिकता त्यांच्या संस्कृतीचीही गुलामगिरी कधी मान्य केली ? हे आपले आपल्यालाच कळले नाही हे खर दुःख आहे.


आपला बर्थडे आजकाल केक कापल्याशिवाय होत नाही, 


आपण सर्वांनी सामाजिक मदिराप्राशनाला (स्पष्ट शब्दात बेवडेगिरी) विरोध न करता मूक मान्यता दिलीय, किंबहुना त्याला प्रतिष्ठाच दिली आहे. या आणि अशा अनेक निरर्थक प्रथा आपण मानसिक गुलामगिरीपोटी स्वीकारल्या आहेत.


१०,००० वर्षांपूर्वी रचलेल्या  ऋग्वेदात "मित्रो दाधार पृथिवीं मुतद्यात" (सूर्याच्या आधाराने पृथ्वी स्थिर आहे.) हे आपल्या संध्याविधानात आपण रोज उच्चारतो पण आपल्या पूर्वजांविषयी आपल्याला अभिमान न वाटता, 

"There is gravitational attraction of Sun that keeps earth revolving around it in orbit" हे Newton चे तेच वचन प्रमाण मानतो आणि त्याचा मात्र अभिमान बाळगतो. इतकच नाही तर "त्यांच सगळच चांगल आणि आपल सगळच वाईट" अशी मानसिकताही बाळगतो.


इंग्रजांच्या दीडशे वर्षाच्या गुलामगिरीने आपल्या मनांवर जो आघात केलाय त्यातून सावरणे केवळ अशक्य झाले आहे. आणि गेल्या २५ वर्षांमध्ये ही पाश्चात्य शरणता वाढीला लागली आहे हे आपले दुर्दैव आहे.


आपल्या पूर्वजांना आधुनिक विज्ञानाचे नियम आणि त्याचे तंत्रज्ञानही अवगत होते फक्त ते ज्ञान त्यांनी फक्त एका वर्गापुरतेच मर्यादित ठेवले ही त्यांची निःसंशय चूक झाली. तत्कालीन सामाजिक परिस्थिती, मौखिक ज्ञान प्रसाराच्या मर्यादा हे सगळे घटकही आपण आज लक्षात घ्यायला हवेत.


या ८० व्या स्वातंत्र्यदिनी आपल्या या राष्ट्राविषयी रास्त अभिमान बाळगून कुठलीही मानसिक गुलामगिरी न करता स्वतंत्र विचाराने राष्ट्राला अजेय करण्याचा संकल्प करूयात. 


सगळ आपल्यातच आहे रे. भूतकाळातल्या झालेल्या चुका टाळण्याचा दृढ निश्चय करूयात आणि

"परम वैभवम नेतु मे तत स्वराष्ट्रम" या वचनाप्रती संपूर्ण भारतीय मानसिकतेने कटिबध्द होऊयात.


जय हिंद.


 — अजूनही भस्मधारण, प्रातःसंध्यावंदन करणारा मातृभूभिमानी रामचंद्र प्रकाशराव.




Tuesday, August 11, 2026

राक्षस, मनुष्य आणि देव

आज सकाळीच कॉलेजला येताना एका कारमागे कुठल्यातरी सदगुरूंचे 

"तुम्ही जगा, दुसर्‍यांना जगवा"

हे बोधवाक्य वाचले,  आणि विचारचक्र सुरू झाले.

"तुम्ही जगा आणि दुसर्‍यांना जगवा." ही संतांची भूमिका झाली.

"तुम्ही जगा आणि इतरांनाही जगू द्या." ही सर्वसामान्य मनुष्यमात्रांची भूमिका झाली.

आपण बघतो की समाजात काही काही व्यक्ती स्वतःही सुखाने जगत नाहीत आणि दुसर्‍यांनाही सुखाने जगू देत नाहीत. अशा व्यक्ती राक्षस असतात.

The Family Man या सिरीजमधले एक वाक्य आठवले. "आदमी जब जानवर बन जाता है तो वह जानवर से बदतर बन जाता है. वो शैतान बन जाता है." 

अगदी खरंय नं. ?

- जगाच्या राक्षसपणाचा, उगाचच केल्या गेलेल्या हेव्यांचा, सदगुणांना दुर्गुण आणि (आपल्या लाडक्यांच्या) दुर्गुणांनाही सदगुण ठरविण्याच्या धडपडीचा एक मूक साक्षीदार

आणि 

या सगळ्या दुनियादारीचा आपल्या (आणि आपल्या कुटुंबियांच्या) व्यक्तिमत्वावर व वागणुकीवर परिणाम होऊ नये म्हणून सतत जपत राहणारा सामान्य मनुष्य, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर

श्रीमदभागवत चिंतन - ४२ सुदामा प्रसंग

भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा हे बालपणापासूनचे मित्र. सांदिपनी ऋषींकडे दोघांनीही ज्ञान आणि विद्या ग्रहण केल्यात. त्यानंतर श्रीकृष्ण राजधर्माचे, क्षत्रियधर्माचे पालन करून आपले जीवन जगू लागलेत तर सुदामा आपल्या ब्राह्मण धर्माचे जीवन जगू लागलेत. ज्ञानदान करणे, समाजाला योग्य मार्गदर्शन करणे ही त्या काळात ब्राह्मणांची मुख्य कर्तव्ये होती. अपरिग्रह, कुठल्याही गोष्टींचा अति संग्रह करणे हे ब्राह्मणधर्माला लांछन होते. घरात तीन दिवसांपेक्षा जास्त दिवसांसाठी अन्नसाठा सुद्धा नको इतकी या अपरिग्रहाची सीमा होती. त्याकाळी समाजातले इतर घटक ब्राह्मणांचा हा अपरिग्रह जाणून त्यांच्या जीवनक्रमाला सुरळितपणे चालू ठेवण्यासाठी ब्राह्मणांना दान आदि करून त्यांचा चरितार्थ चालवित असत.



सुदामा ज्या देशात रहात होते त्या देशात एकूणच दुष्काळी परिस्थिती. समाजातले सगळेच घटक आपला आपला चरितार्थ चालविण्यासाठी धडपड करीत असत त्यामुळे सुदामा हा परिस्थितीने गरीबच होता. फ़ाटके, मलिन कपडे, कुटुंबातल्या सगळ्यांना जेमतेम पुरेल इतकेच अन्न, इतर सुखसुविधांचा अभाव अशा परिस्थितीत सुदामा आणि त्याचे कुटुंब आपला काळ क्रमित होते.


एकेदिवशी या दारिद्राला आणि अत्यंत अभावाच्या जगण्याला कंटाळून सुदामांची पत्नी अत्यंत दीनवाण्या चेहे-याने सुदामांना म्हणाली की द्वारकाधीश भगवान श्रीकृष्ण तुमचे मित्र आहेत असे तुम्ही कायम सांगता. त्यांच्याकडे जाऊन त्यांना आपली परिस्थिती सांगून काही धन मिळाले तर आपले जगणे थोडेतरी सुसह्य होईल. कृपा करून आपण द्वारकाधीशांकडे जाऊन त्यांची भेट घ्यावी. पत्नीच्या सांगण्यानंतर धन मागण्यासाठी नव्हे तर त्या निमित्ताने आपली आपल्या बालमित्राशी भेट होईल या हेतूने सुदामा द्वारकेस जाण्यास तयार झालेत. द्वारकाधीशाकडे रिकाम्या हाताने कसे जायचे ? म्हणून त्यांनी आपल्या पत्नीला द्वारकाधीसाठी काहीतरी भेटवस्तू दे असे सांगितले. तिने शेजारची चार ब्राह्मण घरे भिक्षा मागून मूठभर कोरडे पोहे आणले आणि एका पुरचुंडीत बांधून ती भेटवस्तू सुदामांसोबत द्वारकाधीशांसाठी दिली.


द्वारकेत सुदामा प्रवेशले आणि आपल्या बालमित्राचे हे सगळे वैभव पाहून अत्यंत हरखून गेलेत. अनेक चौक्या पहारे दूर करीत करीत सुदामा श्रीकृष्णाच्या महालापर्यंत पोहोचलेत. फ़ाटक्या आणि मलिन वस्त्रातला आपला मित्र आपल्या द्वाराशी आला आहे हे वर्तमान श्रीकृष्णांना कळताच ते सुदाम्याच्या स्वागतासाठी महालाबाहेर धावत आले आणि त्यांनी तिथेच सुदाम्याला घट्ट मिठी मारली. ते सुदाम्याला अत्यंत आदरपूर्वक आपल्या महालात घेऊन आलेत आणि त्यांनी सुदाम्याला आपल्या मंचकावर बसविले. त्यांचे पाय धुतलेत, त्यांची सेवा केली, त्यांच्या विश्रांतीसाठी आपला मंचक उपलब्ध करून दिला. याप्रसंगी प्रत्यक्ष लक्ष्मीरूप असलेली रुक्मिणी सुदाम्यांना मंचकावर वारा घालीत होती आणि श्रीक्रुष्ण त्यांचे पाय चेपत होते.


विश्रांतीनंतर श्रीकृष्णांनी सुदामदेवांना आपल्या इतर राण्यांशी, पुत्रांशी ओळख करून दिली आणि ते दोघे मित्र गुरूगृहीच्या आठवणींमध्ये रमलेत. गुरूगृही असताना शिकलेली विद्या, झालेल्या गंमतीजंमती, गुरूंचा उपदेश या आठवणींमध्ये दोघेही रमलेत. भगवंतांना काही मागायचे आहे याचा विसर सुदामदेवांना पडला आणि सुदामदेव आपल्याकडे काहीतरी मागण्यासाठी आलेले आहेत हे भगवंतांनी जाणूनसुद्धा त्याबद्दल अवाक्षर काढले नाही. अचानक भगवंतांनी सुदाम्यांना तू माझ्यासाठी काहीतरी भेटवस्तू आणली आहेस की नाही ? असा प्रश्न केला. आपल्या कनवटीला मलिन वस्त्रांमध्ये बांधून आणलेले ते मूठभर पोहे अशा सर्वधनसंपन्न द्वारकाधीशाला भेटवस्तू म्हणून देण्यास सुदामांना संकोच वाटला. ते तो मुद्दा टाळू लागलेत. पण भगवंतांनीच चपळाईने त्यांचा धांडोळा घेऊन ती पोहे बांधलेली पोटली हस्तगत केली आणि त्यातले मूठभर पोहे आपल्या तोंडात टाकून ते अत्यंत मनापासून त्यांचा आस्वाद घेऊ लागलेत. राजमहालातील इतर सर्वजण, श्रीकृष्णांच्या राण्या एका अत्यंत मलिन, फ़ाटक्या वस्त्रात असलेल्या ब्राह्मणाची ही सरबराई पाहून आश्चर्यचकित होत होते. भगवंतांनी एक मूठ पोहे संपवून दुसरी मूठ घेण्यासाठी त्या पोटलीत हात टाकला तोच त्यांचा तो हात प्रत्यक्ष लक्ष्मीस्वरूप असलेल्या रुक्मिणीने पकडला असे श्रीमदभागवतकार वर्णन करत आहेत. एक मूठ पोह्यांनीच भगवंत सुदामदेवांना काय काय आणि किती किती देणार होते हे माता लक्ष्मीने ओळखले होते. त्यांनी दुसरी मूठ पोहेसुद्धा भक्षण केले असते तर त्रैलोक्याचे राज्य सुद्धा सुदामदेवांना देऊन टाकले असते म्हणून माता लक्ष्मीने भगवंतांना दुसरी मूठ पोहे खाऊ दिले नाही असे भाष्यकारांचे विवेचन आहे.



सुदामदेवांची सेवा, आदरसत्कार, भोजन, गप्पागोष्टी झाल्यानंतर सुदामदेव परत जाण्यास निघालेत तेव्हा त्यांना निरोप द्यायला प्रत्यक्ष द्वारकाधीश सीमेपर्यंत आलेत. सुदामदेवांच्या मनातल्या गोष्टी, याचना इत्यादि बाबी त्यांच्या स्वतःच्या संकोचामुळे सुदामदेवांच्या मनातच राहून गेल्यात. आणि द्वारकाधीश इतके वस्ताद की त्या गोष्टा मनोमन जाणूनही त्यांना ते व्यक्त करण्याची वेळ द्वारकाधीशांनी सुदामदेवांच्या द्वारकेच्या वास्तव्यात येऊ दिली नाही. इकडे आपल्या बालमित्राची भेट झाली म्हणून सुदामदेव परतताना अत्यंत हर्षभरित होते.


सुदामदेव त्यांच्या नगरीजवळ आले तेव्हा त्यांना त्या नगरीचा संपूर्ण कायापालट झालेला दिसला. जुने दारिद्र्य जाऊन तिथे आता सर्वत्र वैभवसंपन्नता दिसू लागली होती. सुदामदेवांचे घर आणि कुटुंबियसुद्धा सर्व प्रकारच्या लौकिक ऐश्वर्याने समृद्ध झालेले होते. सगळे लौकिकरित्या संपन्न झालेले होते. सुदामदेवांना हे कृत्य कुणाचे आहे ते कळले आणि मनातून ते अधिकच विरक्त झालेत. यानंतरचे जीवन त्यांनी सुखसमृद्धीत राहूनही भगवंतावरच्या आपल्या मनातील प्रेमात दिवसेंदिवस वाढ करीत घालवलेत. त्या वैभवाने ते भुलले नाहीत. त्या लौकिक वैभवापेक्षा आपल्या मित्राची द्वारकेत झालेली भेट, त्याने दिलेला सन्मान हे त्यांच्या मनात जास्त ठसले होते. लौकिक वैभवापेक्षा प्रत्यक्ष भगवंताची झालेली भेट ही जास्त मौल्यवान असते हे शाश्वत सत्य सुदामदेवांनी जाणले म्हणून ते मुक्तीच्या मार्गाला गेलेत.


पंतकाव्यात या प्रसंगाचे अत्यंत सुंदर वर्णन एका आर्येत केल्या गेलेले आहे.


ऋणतरी मूठभर पोहे, ज्याच्या व्याजात हेम नगरी ही

मुद्दलात मुक्ती देणे, ही कोण्या साहुकारीची रिती ?


मूठभर पोह्यांच्या ऋणात व्याज म्हणून सुदामदेवांना सर्व लौकिक ऐश्वर्य भगवंतांनी दिले, आणि ते मुद्दल चुकवायचे म्हणून त्यांना मुक्ती प्राप्त करून दिली. इतक्या छोट्याशा ऋणाची इतकी परतफ़ेड जगातला कुठला सावकार करीत असतो ? फ़क्त भगवंताच्या दरबारी हा प्रेमाचा, भक्तीचा हिशेब आहे. 


आपण सर्व भाविकही आपल्या नेहेमीच्या लौकिक मागण्या बाजूला ठेऊन भगवंतावर आपला मित्र म्हणून प्रेम करून बघूयात का ? तो अशा प्रेमाचा फ़ार भुकेला आहे. त्याला हे असे निर्व्याज प्रेम अगदी मनापासून आणि फ़ार फ़ार आवडते.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण चतुर्दशी शके १९४८ दिनांक  ११ / ८ / २०२६


११ ऑगस्ट २०२६ 



Monday, August 10, 2026

चितार ओळः नागपूरचा एक ऐतिहासिक आणि सांस्कृतिक ठेवा.

आमचे बालपण इतवारीतल्या पोथी गल्लीत गेले. 


शाळाः सी.पी.ॲण्ड बेरार, महाल. 


रोजचा शाळेचा प्रवास चितार ओळीतूनच व्हायचा. त्या काळी बसने फक्त बाहेरगावी किंवा शहरात लांबच्या ठिकाणी (अभ्यंकर नगर, जयप्रकाश नगर वगैरे ठिकाणे शहराबाहेर गणली जायचीत.) जाता यायच हो. "स्कूल बस" हे लाड नव्हते हो. घराजवळ एक दीड किमी अंतरावर शाळा असली की कशाला बस ? आपली ११ नंबरची "विनोबा ट्रॅव्हल्स"च खरी आणि बरी.


आज बर्‍याच वर्षांनी गणपतीच्या मूर्तीचे advanced booking करायला चितार ओळीत गेलो. बालपण पुन्हा जगलो. एक पिढी पूर्ण बदलली. मेट्रो अगदी जवळून चाललीय पण चितार ओळ अजूनही बदलली नाही हे बघून खूप छान वाटल. सोबत असलेल्या कन्यारत्नाला माझ्या बालपणात घेऊन जाताना टिपलेली क्षणचित्रे. बालपणी कॅमेरा ही अतीव चैनीची गोष्ट होती. असता तर त्याकाळची क्षणचित्रे आणि आजच्या क्षणचित्रांमध्ये कणभरही फरक नसल्याच दाखवून देता आल असत.










श्रीमदभागवत चिंतन - ४१ जरासन्ध आणि शिशुपाल वध

आपले परमभक्त असलेल्या पांडवांचे इंद्रप्रस्थ नगर अवलोकन करण्यासाठी म्हणून भगवंत आपल्या सगळ्या पट्टराण्यांसह द्वारकेवरून इंद्रप्रस्थाला गेलेत. भगवंत आपल्या घरी आलेले पाहून पांडवांना अतिशय आनंद झाला. कुंतीला आपल्या या भाच्याला पाहून प्रेमाचे भरते आले. भगवंतांचे आणि त्यांच्यासह आलेल्या त्यांच्या पट्टराण्यांचे सर्व इंद्रप्रस्थवासियांनी मनापासून स्वागत केले, त्यांचा यथोचित आदरसत्कार केला. भगवंतांनी पांडवांना राजसूय यज्ञ करण्याची आज्ञा दिली.


राजसूय यज्ञासाठी यज्ञाश्व सोडला गेला. आसपासच्या राज्यांमध्ये तो यज्ञाश्व सुखेनैव फ़िरून जयपत्रे घेऊन आला पण मगध देशातून मात्र विजय प्राप्त होईना. मगध देशात भगवंतांनी आत्त्तापर्यंत अठरा वेळा पराजित केलेला जरासन्ध राज्य करीत होता. मधल्या काळात त्याची शक्ती इतकी वाढली होती की त्याला समोरासमोर युद्धात पराजित करणे कठीण होऊन बसले होते. तेव्हा उद्धवाने द्वारकेत भगवंताला सांगितलेली युक्ती त्यांनी जरासंधासोबत वापरण्याचे ठरविले. भगवंत स्वतः अर्जुन आणि भीमाला घेऊन मगध नगरीत ब्राह्मण वेषाने गेलेत. जरासंध दुष्ट असला तरी अतिथीधर्म पालन करीत होता. अतिथी म्हणून त्याच्याकडे जायचे आणि त्याला मल्लयुद्धाचे आव्हान द्यायचे असा श्रीकृष्ण आणि पांडवांचा हेतू होता.



जरासंधाने आपल्या धर्माप्रमाणे या अतिथींचे स्वागत केले आणि त्यांना येण्याचा हेतू विचारला. तेव्हा त्या ब्राह्मण वेषातील अतिथींना आपण क्षत्रिय असून आम्हाला आपल्यासोबत मल्लयुद्ध करण्याची इच्छा असल्याचे सांगितले. अतिथींनी आपली खरी रूपेही जरासंधासमोर प्रगट केलीत. हा पांडुपुत्र भीम, हा कुंतीसुत अर्जुन आणि मी तुझा जुना विरोधक कृष्ण असे भगवंतांनी सांगताच जरासंधाला हसू फ़ुटले. तो म्हणाला हे कृष्णा, माझ्यासोबतच्या मागील युद्धात तू मथुरेतून पळून द्वारकेत आश्रय घेतलास त्यामुळे तुझ्याशी मी युद्ध करणार नाही. हा अर्जुन वनवासाच्या काळात बृहन्नडेच्या रूपात राहत होता त्यामुळे त्याच्याशी सुद्धा मला मल्लयुद्ध करता येणार नाही. मी भीमसेनाशी मल्लयुद्ध करेन. सगळ्यांची त्याला सहमती मिळाली आणि भीमसेनाचे व जरासंधाचे मल्लयुद्ध सुरू झाले.


सतत अठ्ठावीस दिवस मल्लयुद्ध चालले तरी जरासंधाचा पराभव होईना. भीमसेन हताश झाला तेव्हा भगवंतांनी जरासंधाच्या जन्माचे रहस्य त्याला सांगितले आणि त्याला मल्लयुद्धातच मधोमध चिरून त्याच्या शरीराचे दोन तुकडे करण्याची आज्ञा दिली. दुस-या दिवशीच्या युद्धातच भीमसेनाने भगवंताची आज्ञा प्रमाण मानून जरासंधाचे बरोबर मधून दोन तुकडे केलेत आणि त्याचा वध केला. जरासंधाला जिंकल्याबरोबर पांडवांचा राजसूय यज्ञ पूर्ण झाला. भगवान श्रीकृष्णांनी जरासंधाने बंदिवान करून ठेवलेल्या अनेक राजांना त्याच्या कैदेतून मुक्त केले आणि त्यांचे गतवैभव त्यांना प्राप्त करून दिले. त्या सर्व राजांनी आपल्या उपकारकर्त्या भगवंताची जी स्तुती गायली आहे ती आपण आजही अत्यंत कृतज्ञतेने म्हणतो.


कृष्णाय वासुदेवाय, हरये परमात्मने

प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः



राजसूय यज्ञाची विधिवत सांगता करण्यासाठी पांडवांनी आपल्या इंद्रप्रस्थ नगरीत सर्व ऋषीमुनी आणि विविध देशींच्या राजांना पाचारण केले. सर्व मंडळी अत्यंत आनंदाने तिथे आलीत. त्याप्रसंगी त्य यज्ञाच्या अग्रपूजेचा मान कुणाला द्यायचा यावरून तिथे चर्चा झाली आणि सर्वानुमते हा मान भगवान श्रीकृष्णासारख्या पुरूषोत्त्तमाला मिळायला हवा असा सूर निघू लागला. पण भगवंताचा जन्मोजन्मीचा शत्रू असल्या शिशुपालाला ते पटले नाही. तो भर सभेत भगवंताची निर्भत्सना करू लागला, भगवंताला दूषणे देऊ लागला. शिशुपालाचे शंभर अपराध भरण्याचीच भगवंत वाट बघत होते. ते तसे भरल्याबरोबर भगवंतांनी त्या भर सभेत आपले सुदर्शनचक्र सोडून शिशुपालाचे मस्तक क्षणार्धात धडावेगळे केले. द्वेषभावनेने का होईना भगवंताचा सतत ध्यास घेतलेला असल्याने शिशुपालाच्या देहातली दिव्य ज्योत भगवंतांच्या हृदयात जाऊन विराजमान झाली. त्याला भगवंताच्या हृदयात अक्षय्य स्थान मिळाले. जय आणि विजय या आपल्या पार्षदांच्या अपराधासाठी त्यांचे तीन असुरजन्म हिरण्याक्ष आणि हिरण्यकश्यपू, रावण आणि कुंभकर्ण व शिशुपाल आणि दंतवक्त्र या स्वरूपात पूर्ण होऊन ते पार्षद आपल्या मूळ सेवेत रूजू झाले होते. पांडवांचा राजसूय यज्ञ यथासांग पार पाडल्यानंतर भगवंत पुन्हा द्वारकानगरीत आलेत.

॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण द्वादशी / त्रयोदशी शके १९४८ दिनांक  १० / ८ / २०२६


१० ऑगस्ट २०२६ 


श्रीमदभागवत चिंतन - ४० भगवंतावर चोरीचा आळ

भगवान श्रीकृष्णावर त्यांच्या बालपणीच गोपींच्या घरांमधून दही, दूध, लोण्याची चोरी केल्याचे अनेक आळ आलेले होते. त्यामुळे चोरीचे आळ त्यांना नवे नव्हते. पण हे सगळे लाडीक आळ होते. भगवंत नंदबाबांच्या समृद्ध घरातले पुत्र होते आणि आपल्या सवंगड्यांसाठी ते बालपणी या चो-या करायचेत पण भगवंत द्वारकाधीश असताना मात्र त्यांच्यावर चोरीचा आळ आला आणि त्याला भगवंतांनी कसे धीरोदात्त्तपणे तोंड दिले हे अभ्यासण्यासारखे आहे.


सत्राजित नावाचा एक तपस्वी क्षत्रिय होता. त्याने खूप मनापासून सूर्योपासना केली. भगवान सूर्यनारायण त्याच्यावर प्रसन्न झालेत आणि त्याला स्यमंतक नावाचा आपला एक मणि दिला. त्या मण्याचे अंगभूत तेज इतके होते की तो मणि गळ्यात धारण केल्यानंतर सर्व प्रजाजनांना साक्षात सूर्यनारायण आपल्या नगरात प्रगट झाल्यासारखे वाटले. सत्राजिताने तो स्यमंतक मणि आपल्या देवघरात सुपूजित केला आणि त्याची प्रतिष्ठापना केली. रोज तो मणि आपल्या भाराच्या आठपट सोने त्या घरात प्रदान करीत असे आणि तो मणि जिथे राहील तिथे रोग, भय, शत्रू, मानसिक किंवा शारिरीक दोष यांचा लवलेशही राहत नसे. भगवान श्रीकृष्णांनी सत्राजिताला भेटून राज्याच्या व्यापक हितासाठी तो स्यमंतक मणि हा मथुरेचे राजा उग्रसेन यांच्याकडे सुपूर्द करायला सांगितले. पण त्या स्यमंतक मणिप्राप्तीचा इतका अहंकार सत्राजिताला चढला होता की त्याला वाटले की माझ्याकडे मणि आहे हे श्रीकृष्णाला सहन होत नाही म्हणून तो हा सल्ला देतोय. त्याने तो सल्ला धुडकावून लावत मणि स्वतःजवळच ठेवला.


एके दिवशी सत्राजिताचा भाऊ प्रसेनजित हा स्यमंतकमणि गळ्यात परिधान करून घोड्यावर बसून वनात शिकारीसाठी गेला असताना एका सिंहाने त्याला त्याच्या घोड्यासकट मारून टाकले आणि तो मणि घेऊन सिंह जात असताना त्याची जांबुवताशी झटापट झाली. जांबुवंत अत्यंत पराक्रमी होता त्याने त्या सिंहाला मारून तो मणि हस्तगत केला आणि गुहेत राहत असलेल्या आपल्या लहान मुलांना तो मणि खेळायला दिला.



इकडे प्रसेनजित न परतल्यामुळे सत्राजित शोकाकूल झाला आणि माझ्या भावाचे, प्रसेनजिताचे, स्यमंतक मण्यासाठी अपहरण भगवान श्रीकृष्णानेच केलेले आहे असा आळ त्याने भगवंतावर घेतला. हळूहळू ही वार्ता कर्णोपकर्णी झाली. प्रजाजनांमध्ये कुजबूज सुरू झाली. परिस्थितीजन्य पुरावे भगवंताच्या विरोधातच होते. या खोट्या आळामुळे भगवंत दुःखी झालेत पण डगमगले मात्र नाहीत. त्यांनी त्या मण्याच्या शोधासाठी काही प्रजाजन व सैन्य सोबत घेऊन वनात प्रसेनजिताच्या शोधाची मोहीम काढली.


वनात काही अंतर जाताच सिंहाने मारलेल्या घोड्याचे आणि प्रसेनजिताचे अवशेष सगळ्यांना दिसले. प्रसेनजिताला सिंहानेच मारून खाल्ले यावर सगळ्यांचे एकमत झाले. थोडे पुढे जाताच भगवंत जांबुवंतांच्या गुहेत शिरले आणि तिथे त्या स्यमंतक मण्याशी खेळत असलेली अज्ञान अस्वलबालके त्यांना दिसली. भगवंत तो मणि त्या बालकांकडून हस्तगत करण्यासाठी पुढे जाणार तेव्हढ्यात कुणीतरी पुरूष आपल्या गुहेत येऊन आपल्या बालकांना त्रास देतोय असा ग्रह करून घेत जांबुवंत पुढे सरसावला आणि त्याने श्रीकृष्णांशी मल्लयुद्ध सुरू केले. बराच वेळ कुणीही कुणाला हार जाईना. मग त्या दोघांचे मुष्टियुद्ध सुरू झाले. त्यात जांबुवंतावर अनेक मुष्टिप्रहार करून भगवंतांनी त्याचे बळ अगदी क्षीण करून टाकले. त्या युद्धामध्येच जांबुवंताला आपल्या या प्रतिस्पर्ध्याचे पूर्व अवतारातले श्रीरामांचे स्वरूप आठवले. युद्ध सोडून देऊन तो भगवंतांना शरण आला आणि त्याने भगवंतांची स्तुती आरंभिली. मागील अवतारात मी तुमचा दास होतो आणि म्हणूनच या अवतारात सुद्धा आपण मला दर्शन दिले हे माझे केव्हढे भाग्य अशी त्याने भगवंतांची स्तुती केली आणि स्यमंतक मण्याची कथा ऐकून तो मणि भगवंतांना दिला. सोबतच आपली कन्या जांबवती हिच्याशी भगवंतांचा विवाह करून दिला.


स्यमंतक मणि घेऊन आणि आपली नवपरिणीत वधू घेऊन भगवंत द्वारकानगरीत परतलेत. भगवंतांनी सगळ्या प्रजाजनांना एकत्र सभेत बोलावले आणि स्यमंतक मणि सत्राजिताकडे प्रदान करून स्वतःवरच्या आरोपांचे किटाळ धुवून काढले. सत्राजित मनोमन फ़ारच खजिल झाला. आपण कारण नसताना भगवान श्रीकृष्णाच्या हेतूवर संशय घेऊन फ़ार मोठी चूक केली अशी बोचणी त्याला लागली. त्याने आपली अत्यंत सुशील, सर्वगुणी आणि देखणी कन्या, सत्यभामा ही भगवंतांना दिली. सत्यभामेचा विवाह भगवान श्रीकृष्णांशी झाला.


त्यानंतर भगवंताचे विवाह सूर्यदेवांची कन्या कालिंदी, उज्जैन नगरीची राजकन्या मित्रविन्दा, कौशल देशाचा राजा नग्नजित याची कन्या सत्या उपाख्य नाग्नजिती, कैकय देशातल्या श्रीकृष्णांच्या आत्याची, शृतकिर्तीची, मुलगी भद्रा आणि मद्रदेशाची राजकन्या लक्ष्मणा ह्यांच्याशी झालेत. प्रत्येक विवाहानंतर द्वारकेत अत्यंत विधिवत लग्न झालीत आणि सर्वत्र आनंदी आनंद झाला.



प्रागज्योतिषपूर येथे भौमासूर नावाच्या असुराने अनेक देशातील एकूण १६००० राजकन्यांना बळजबरीने अपहरण करून आपल्या कैदेत ठेवलेले होते. भगवंतांना हे अत्याचारी वृत्त्त कळताच ते सत्यभामेसह गरूडावर स्वार होऊन प्रागज्योतिषपूर येथे गेलेत. तिथे भगवंतांनी सत्यभामेसह अतुलनीय पराक्रम गाजवून भौमासुराचा वध केला. त्याचा पुत्र भगदत्त्त हा भयभीत होऊन भगवंतांना शरण आला त्याला त्यांनी अनुग्रहित केले आणि भौमासुराच्या तावडीतून त्या १६००० राजकन्यांची सुटका केली.


भगवान श्रीकृष्ण भौमासुराचा वध करून त्याच्या महालात प्रवेश करताक्षणीच त्या बंदिवान राजकन्यांना त्यांचे रूप आणि पराक्रम दिसला. त्या सगळ्या जणी श्रीकृष्णावर मोहीत झाल्यात आणि त्यांनी त्याला आपला पती मानले व मनोमन वरले. त्यामुळे त्या सगळ्यांशी भगवंतांनी विवाह केलेत. त्यांना भौमासुराच्या नरकातून मुक्त करून त्यांचा उद्धार केला. विवाह करून त्या सगळ्यांना प्रतिष्ठा प्राप्त करून दिली.


॥ गोपालकृष्ण महाराज की जय ॥


- राम सदगुरू मायबाई महाराज "श्रीमदभागवत चिंतन" आषाढ कृष्ण एकादशी शके १९४८ दिनांक  ९ / ८ / २०२६


९ ऑगस्ट २०२६