आजकाल एक्सप्रेस गाड्यांना सरसकट WAG 9 एंजिने मिळताहेत.
मी एक प्रवासी पक्षी,
Saturday, January 25, 2025
भारतीय रेल्वेची "नाथाघरची उलटी खूण"
Friday, January 24, 2025
प्राणी, पक्षीसृष्टी आणि अध्यात्मिक अनुभूती
ती प्रभातीची होती वेळा ।
प्राची प्रांत ताम्र झाला ।
Friday, January 17, 2025
सायंकालिन उपासनेतले तात्विक विचार
दुकानातून अगदी पारखून, खूप सुवासिक म्हणून आणलेल्या, उदबत्तीचा सुवास आपल्याला फक्त त्या फोडलेल्या पुड्यातून लावलेल्या पहिल्या उदबत्तीपुरताच येतो. त्या पुड्यातल्या नंतरच्या उदबत्त्यांचाही तसाच सुवास येत असावा. पण आपले नाक त्या वासाला सरावल्याने आपल्याला जाणवत नाही.
बेळगाव: एक अनामिक ओढ असलेले गाव
Wednesday, January 15, 2025
चहा: पिण्याचे एक शास्त्र असत ते
सकाळी उठल्या उठल्या पहिला चहा.
वर्तमानपत्र आल्यानंतर वर्तमानपत्र वाचताना सोबत चहाचा कप हवाच म्हणून आणखी एक चहा.
दूधवाल्याने सकाळी दूध दिल्यानंतर "नवीन"दूधाचा आणखी एक चहा. हे एक अवघड प्रकरण आहे. भलेही दूधवाल्याने दूध आदल्या दिवशीच काढून दुस-या दिवशी सकाळी आपल्याघरी विकायला आणलेले असो.
शेजारचे काका सकाळी सकाळी वर्तमानपत्र वाचायला घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी एखादा कप चहा. सोबत आपलाही अर्धा कप.
Wednesday, January 8, 2025
चिंतनक्षण - ८
"साधना म्हणजे अनेक अडथळ्यांची सात्विक शर्यतच आहे." - डॉ. सुहास पेठे काका
एखाद्या मुमुक्षूने साधना करायची ठरवली आणि त्यादृष्टीने पावले टाकायला सुरूवात केली की आपल्या सगळ्यांचा अनुभव असा आहे की त्यात अनेक अडथळे येतात. त्यातल्या अडथळ्यांचा आपण अधिक सूक्ष्म विचार केला तर आपल्या लक्षात येईल की यातले जास्तीत जास्त अडथळे केवळ आपल्या विचार करण्याच्या पद्धतीमुळेच आपल्या साधनेत येत असतात. त्या अडथळ्यांना कुठलीही बाह्य परिस्थिती जबाबदार नसते.
साधनेला सुरूवात केल्यानंतर आपल्यात सात्विक गुणांची वृद्धी होऊ लागते. राजस आणि तामस गुण हळूहळू क्षीण व्हायला सुरूवात होते. आणि नेमका हाच क्षण स्वतःला सांभाळण्याचा असतो. आपल्या सात्विकतेचा सुद्धा अहंकार आपल्याला आपल्या साधनेच्या उद्दिष्टांपासून दूर नेऊ शकतो. आपण आता अध्यात्मात "बन चुके" झालोय, अध्यात्मात आपल्याला बरेच काही साध्य झालेय हा अहंकार आपल्याला हव्या त्या दिशेने प्रगती करू देत नाही हे सर्व साधकांनी कायमच लक्षात ठेवायला हवेय.
म्हणूनच साधनेला सुरूवात केल्यानंतर साधकाने स्वतःच्या मनाला विशेष रूपाने जागृत ठेवून कुठलही अहंकार आपल्या मनाला शिवू नये हा विचार ठेवला तरच त्यांच्या साधना मार्गात अडथळे येणार नाहीत आणि साधकांना त्यांचे अंतिम ध्येय गाठता येईल.
- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" पौष शुद्ध नवमी शके १९४६ दिनांक ८ / १ / २०२५
Tuesday, January 7, 2025
चिंतनक्षण - ७
"कर्तृत्वाने हरला आणि ते माणसाला कळले म्हणजे भगवंताची कृपाच झाली म्हणायचे." - डॉ. सुहास पेठे काका
मनुष्य आपल्या कर्तृत्वावर फार विश्वास ठेवतो आणि माझ्या कर्तुत्वामुळेच माझ्या जीवनातल्या सगळ्या चांगल्या घटना घडत आहेत हे मानून चालतो. पण आपल्या लक्षात येईल की मनुष्य जीवनातल्या सगळ्या चांगल्या गोष्टींचे अगदी ९९ % श्रेय जरी त्या मनुष्याच्या कर्तृत्वाला दिले तरी त्यात उरलेला १ % त्याच्यावर असलेल्या परमेश्वरी आधाराचा भाग असतो. यात कापूस आणि ठिणगीचा दृष्टांत चपखल बसतो. अगदी १०० किलो कापूस जरी असला तरी तो स्वतःहून पेट घेणार नाही. पण त्यावर एका अर्ध्या ग्राम वजनाची ठिणगी जरी पडली तरी तो धडाडून पेटेल. तसे मनुष्याच्या ढीगभर कर्तृत्वाला कणभर तरी परमेश्वर कृपा आधाराला असतेच.
पण ज्याक्षणी अशी कर्तृत्वावान माणसे जीवनात पराभवाला सामोरे जातात तेव्हा त्यांना फार विषण्णता येते. आपले नक्की काय चुकले हेच त्यांना कळेनासे होते. आपले कर्तृत्व कुठे कमी पडले याचाच ते गांभीर्याने विचार करू लागतात.
ज्याक्षणी अशा कर्तृत्ववान मनुष्याना आपले कर्तृत्व आणि त्याला हवी असलेली परमेश्वरी कृपेची जोड यातला दुवा लक्षात येतो त्याक्षणी ती सगळी माणसे परमेश्वरी अनुसंधानासह पुन्हा आपापले कर्तृत्व गाजवायला सिद्ध होतात आणो पुन्हा नवी झेप घेतात. नवी क्षितीजे धुंडाळण्यासाठी, नव्या आकांक्षांना साकार करण्यासाठी.
ज्यांना फक्त आपलया कर्तृत्वावरच विश्वास ठेवायचा असतो, त्यांना मात्र नक्की काय चुकले हे काळातच नाही आणि पुढला मार्ग सापडत नाही. म्हणजे आपले कर्तृत्व सर्व काही घडवू शकत नाही हे ज्या माणसाला कळले त्याचा पुढील अभ्युदयाचा मार्ग मोकळा होतो. म्हणून अशा मनुष्यावर भगवंताची कृपाच झाली असे म्हणावे लागेल.
- राम सदगुरू मायबाई महाराज "चिंतनक्षणांवर चिंतन" पौष शुद्ध अष्टमी शके १९४६ दिनांक ७/ १ / २०२५