Showing posts with label Sachin Sagdeo. Show all posts
Showing posts with label Sachin Sagdeo. Show all posts

Tuesday, January 11, 2011

पहिला वीकएण्ड २०११.

दि. ०८/०१/२०११.
कॊलेज संपवून मी दीड वाजता घरी आलो. लगेच थोडस खाऊन आम्ही आमच्या कारने श्री. देवईकर सरांच्या घरी शंकरनगर ला गेलो. तिथून दुपारी १४.४० ला चंद्रपूर साठी निघालो. मध्ये रिलायन्स पेट्रोल पंपात गाडीत गॆस भरून चंद्रपूर च्या दिशेने निघालो. आम्ही सर्व जण यंदा हुरडा खायला चंद्रपूरला निघालो होतो. मी सुद्धा जवळपास ५ वर्षांनंतर असा हुरडा वगैरे खायला निघालो होतो.
नागपूर ते चंद्रपूर रस्ता लहानपणापासून फ़ार परिचयाचा. आत्ता गाडी घेतल्यानंतर तर फ़ारच आवडतोय हा रस्ता.भलेही जांब ते वरोरा हा रस्ता फ़ार खराब असेल पण त्या माहेरच्या वैद्यासारखे ह्या रस्त्याचे अवगुणही द्रुष्टीआड होतात.
जांब ला पोहोचायला जवळपास एक तास दहा मिनीटे लागतात. हॊटेल अशोका मध्ये थांबल्याशिवाय हा प्रवास पूर्ण होत नसल्याप्रमाणे आम्ही तिथे थांबलो. थोडी पोटपूजा आणि चहा. १६.१९ ला चंद्रपूर साठी प्रस्थान.
जांब ते वरोरा हा रस्ता दिवाळी पेक्षाही जास्त खराब झालेला दिसतोय. तरीही संध्याकाळी १८.१५ ला आम्ही घरी आलोय. गेल्या दोन वर्षांमध्ये चंद्रपूरात वाहनांची (विशेषतः चारचाकींची) संख्या खूपच वाढल्याचे जाणवतेय. प्रदुषण तर गेल्या १० वर्षात कमालीचे वाढलेय. पडोली मध्ये आलो की धुराचे आणि धुळींचे लोट्च्या लोट गाडीवर चाल करून येताना दिसतात. हे कुठेतरी थांबायला हवे आहे.
नेहेमीप्रमाणे दादामामांकडे स्वागत आणि तिथेच रात्री गप्पा मारत मारत झोप.



डॊ. देवईकर व सौ. देवईकर


दि. ०९/०१/२०११

सकाळी लवकर उठून आम्ही आवरतोय. साधारण सव्वा दहा च्या सुमाराला आम्ही निघतोय.अंचलेश्वर मंदीर आणि महाकाली मंदीरात दर्शन घेउन आमचे बल्लारशहाच्या दिशेने प्रस्थान. हा रस्ता तर दुपदरीच पण फ़ार वर्दळीचा. वाहनांना ओव्हरटेक करण खूप कठीण. एखाद्या ट्रक च्या मागे दहा दहा, पंधरा पंधरा मिनीटे हळू हळू जाण भाग आहे.
सकाळी अकरा च्या सुमाराला आम्ही दहेली च्या शेतावर पोहोचतोय.

सोबत सचीन व सौ.सानिका सचीन. दोन गाड्या घेऊन आमचा ताफ़ा अगदी शेतात घुसला. मुलांच्या आनंदाला उधाण आलय.


मृण्मयी किन्हीकर,शर्वरी सगदेव आणि सोहम सगदेव

आमच्या सोबत सध्याचे मालक (सचीन सगदेव) आणि भावी मालक (सोहम सगदेव) दोघेही आहेत. आम्ही सर्वांनी प्रथम बोराच्या झाडाकडे मोर्चा वळवला. मनसोक्त बोरे वेचून खुल्या आणि मोकळ्या निसर्गाचा मुक्त आस्वाद घेतला.
"दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे" ची आठवण होइल असे शेत. त्यात पिकत असलेला भाजीपाला आणि फुले. मस्त हवा. आम्ही आमची फुफुसे भरून घेतलीत. मुलांच्या मस्तीला तर उधाण आले होते.

डॊ. देवईकर व सचीन सगदेव




जेवण बनवण्यात थोड्या अडचणी येणार होत्या त्यामुळे आम्ही न्याहारीवरच समाधान मानले. आणि तृप्त मनाने निघालो.
चंद्रपूरला पुन्हा पाहूणचार घेऊन दुपारी १६.४७ ला निघालो. नागपूर च्या अगदी जवळ खापरी उड्डाण पुलावर अपघातामुळे वाहतूक खोळंबा झालेला होता. जवळ्पास पाऊण तास त्यात वाया गेला. रात्री २१.३१ ला आम्ही सर्व घरी आलो. वाटेत श्री देवईकर सरांना त्यांच्या घरी सोडले.
मस्त वीकेण्ड. त्याच्या आठवणी मनात घेऊन परततोय.