Thursday, September 15, 2022

बॉलीवुड्च्या डॉयलॉग्जचा प्रभाव.

शाळेतले, कॉलेजातले मित्र गेट टुगेदरच्या निमित्ताने ब-याच वर्षांनी भेटतात. शाळेत तर सगळीच कोकरे पापभिरू असतात पण कॉलेजच्या चार वर्षात, हॉस्टेलला रहात असताना, घरचे कुणीही रोज बघत नसतानाही जी काही १० - २० टक्के जनता अगदी पापभिरू राहिलेली असते दारू सिगारेट आदि प्रलोभनांपासून स्वतःला जपत आलेली असते त्यांच्यातलेही काही बाप्ये (आणि काही बायाही) आता मात्र सरावलेले पेताड आणि फ़ुकाड झालेले असतात. 


गेट टुगेदरच्या पार्टीत खूप वर्षांनी भेटलेल्या एखाद्या मित्र मैत्रिणीकडून आपल्यालाही एखादा पेग ऑफ़र होतो. आपण स्पष्ट आणि परखड नकार देतो. त्यांच्या चेहे-यावर आश्चर्य दाटून येते. "राम, तू मात्र अगदी कॉलेजमध्ये होतास तसाच अजूनही आहेस हं, अगदी." असही कुणीसं किंचित असूयेने ("याला जसे याबाबतीत अजूनही  कोरडे रहायला जमले तसे आपल्याला का नाही ? आपण प्रवाहपतित होऊन का आणि कसे वहात गेलोत" या भावनेनेच असूया जास्त.) म्हणतेही. अशावेळी आपल्या अंगात "तेजाब" चा इंन्सस्पेक्टर सुरेश ओबेरॉय संचरतो. "तुमने भलेही अपना रास्ता और पेशा बदल दिया हो. लेकिन मै अब भी वही रास्ते पर चल रहा हू, और मेरा पेशा भी वही है." असे शब्द आपल्या तोंडातून जरी निघाले नाहीत तरी आपल्या चेहे-याद्वारे प्रगट होत असतात.


आजच मराठीतल्या एका संकेतस्थळावर "ते ब्रम्हास्त्र न बघता त्याच्यावर बहिष्कार टाकू नका" या छापाची प्रचारकी पोस्ट वाचली. आणि एकदम शोलेतला ठाकूर आठवला. "जाओ, जाके बॉलीवूडवालों से कह दो की तमाम फ़िल्लम देखनेवालोने उनके फ़ाल्तू नखरोंको बर्दाश्त करना बंद कर दिया है." 


शेवटी एका लेखकाला सिनेमातले डॉयलॉग्जच आठवणार ना ?


- रंगभूमी आणि रंगभूमीवरच अपार प्रेम असलेला, एकेकाळचा अभिनेता, नट रामकुमार किन्हीकर.

No comments:

Post a Comment