Thursday, February 11, 2021

 पु. ल. म्हणतात एखाद्या भैय्याला त्याने रबडी खाल्ल्यानंतर तुम्ही "बे दुणे किती ?" विचारा. त्याचे उत्तर तो कदाचित "पाँच" असे देईल पण उत्तर देताना त्याचा आविर्भाव असा असेल की अख्ख्या जगात गणित जणू त्यालाच कळलेले आहे.

उत्तरेत फिरताना किंवा उत्तरेतली मंडळी इथे आल्यानंतर त्यांच्याशी व्यवहार करताना आपल्या सगळ्यांनाही हा अनुभव नेहमी येतो.
प्रयागराजच्या रबडी सारखाच एक महत्वाचा पदार्थ. "गिलोरी"



याच्या रंग रूपानेच खवय्या आकर्षित होतो आणि तोंडात टाकल्यावर विरघळून जो मुखरस तयार होतो, त्यानंतर कुणी "सतरा साते किती ?" हा प्रश्न जरी विचारला तरी त्याचे उत्तर "एकशे सत्तावन्न" असे आत्मविश्वासाने देता येईल. फक्त उत्तर देताना आपल्या मुखकमलाचा जमिनीशी असलेला कोन किमान ४५ अंश ऊर्ध्व दिशेला असावा याची काळजी घ्यावी नाहीतर मुखरस कपड्यांवर पडून कपड्यांवर नवचित्रकलेचे एखादे प्रात्यक्षिक व्हायचे.
- पुल भक्त प्रा. रामभाऊ खादाडखाऊ पुरभैय्ये.

No comments:

Post a Comment