Tuesday, November 14, 2023

बंधनापासूनी उकलली गाठी

जगदगुरू श्रीतुकारामबाबा लिहून गेले 


"बंधनापासूनी उकलली गाठी, देता आली मिठी सावकाश"


हा जीव जोवर "मी देह" या बंधनात अडकून इतर जगाला स्वतःपेक्षा वेगळे मानीत राहील तोवर तो बंधनात आहे आणि जोवर एकदा ही गाठ उकलली की त्याला स्वतःमधल्या आणि जगामधल्या समस्त प्राणीमात्रांमधल्या अभिन्नतेचा, अद्वैताचा साक्षात्कार होईल आणि मग इतर सगळे प्राणीमात्र आणि आपण यात भिन्नत्व नाही या अभेदतत्वाचे त्या जीवाला ज्ञान होईल आणि मग जीवाला परब्रम्हाला खरी मिठी मारता येईल.


त्यातच त्या जीवाला ज्ञानोबामाऊलींचा 


"क्षेम देऊ गेले तव मी ची मी एकली"  


चा सुद्धा प्रत्यय येईल. कारण तो जीव आणि परब्रम्ह यांच्यात भेद उरला नाही याची प्रचिती आल्यानंतर जीवाने मिठी मारायची तरी कुणाला. जो मिठी मारतो आणि ज्याला मिठी मारायची ते दोन्ही एकच असल्यावर ही मिठी कशी होणार ?


स्वामी विवेकानंदांनी त्यांच्या 

"Each soul is potentially divine. The goal is to manifest this divinity within by controlling nature, external and internal. Do this either by work, or worship, or psychic control, or philosophy – by one or more or all of these-and be free. All power is within you; you can do anything and everything." 

या वाक्यात श्रीतुकोबांच्या आणि ज्ञानेबामाऊलींच्या याच तर तत्वाचे प्रतिपादन केलेले आहे. 


"एकम सत, विप्रा बहुधा वदन्ती" या वेदवाणीनुसार एकाच सत्याचा अनेकांना अनेक प्रकारांनी साक्षात्कार झाल्यानंतर ते सर्व वेगवेगळ्या मार्गांनी एकाच मुक्कामाला गेलेले असतील हा निष्कर्ष आपण काढू शकतोच.


- प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर यांचे सायंकालीन चिंतन (कार्तिक शुद्ध प्रतिपदा) दिनांक १४ / ११ / २३. 

No comments:

Post a Comment