Wednesday, February 8, 2012

माहौल निवडणुकांचा

"संत असती वेगळाले, परी ते अंतरी मिळाले" असं संतांबाबत म्हटले जाते ते राजकारण्यांबाबतही खरच आहे. काल संध्याकाळी नागपूरातल्या गांधी पुतळा चौक इतवारी येथले हे दृष्य बोलके आहे.


एकाच गाडीवर दोन पक्षांचे दोन कार्यकर्ते आपापल्या पक्षांची निवडणूक प्रचार सामग्री घेऊन चाललेले होते. त्यांना तरी दोष कशाला द्यायचा म्हणा? दोन अगदी विरूध्द पक्षाची नेते मंडळीच कार्यकर्त्यांना झुंजवून ठेवत आपल्या खाजगी मैत्रीचा जाहीर उच्चार करायला घाबरत नाहीत तिथे बिचा-या कार्यकर्त्यांनी तरी काय करावे?

काय म्हणताय? ’ विचारधारा वगैरे?’
काय राव? परग्रहावरून आलात का?

No comments:

Post a Comment