Saturday, November 14, 2015

संस्कृत सुभाषिते - २


" भाषासु मुख्या मधुरा, दिव्या गीर्वाणभारती
तस्याम ही काव्यम मधुरम, तस्मादपी सुभाषितम "

(संस्कृत गद्य भाषा ही तर मधूर आहेच पण त्यापेक्षाही त्यातले काव्य मधूर आणि त्यापेक्षाही सुभाषिते मधूर.)

असे का म्हटले आहे याचे प्रत्यंतर हे सुभाषित पाहून येईल. वक्रोक्ती (लेकी बोले सुने लागे) छापाचे हे सुभाषित आहे. सुभाषितकार म्हणतात 

" असारे खलु संसारे, सारम श्वशुरमंदिरम,
हरो हिमालये शेते, हरः शेते महोदधौ "

या जगात सगळ्याच गोष्टी अर्थहीन आहेत. फ़क्त सासुरवाडी तेव्हढी खरी. पहा बरं भगवान शिव हा हिमालयातच (आपल्या सासुरवाडीत) राहतो आणि भगवान विष्णू हे क्षीरसागरात (त्यांच्या सासुरवाडीत) वास्तव्य करतात.

आता तुम्हाला ते हिंदी चित्रपटातले " सासू तिरथ, ससरा तिरथ...." गाणे आठवले असेल. मला नव्वदोत्तरी सुशिक्षित घरांमध्ये मुलीच्या माहेरच्यांचा वाढलेला अती हस्तक्षेप आठ्वला. या विषयावर आमच्या अपर्णाताई रामतीर्थकरांच एक सविस्तर भाषण पण आहे. त्याची लिंक नंतर कधीतरी देईन.