Wednesday, December 12, 2012

कृष्णभूमीत ६ : राधेचे गाव - बरसाना


यापूर्वीचा प्रवास

कृष्णभूमीत १ : नागपूर ते नवी दिल्ली

कृष्णभूमीत २ : नवी दिल्लीत

कृष्णभूमीत ३ : आग्रा

कृष्णभूमीत ४ : फ़तेहपूर सीकरी

कृष्णभूमीत ५ : वृंदावन


दि. १३/०५/२०११.

श्रीकृष्ण चरित्र ज्याप्रमाणे श्रीराधेच्या उल्लेखाशिवाय अपूर्ण आहे त्याप्रमाणेच कृष्णभूमीची सहलही श्री राधेच्या गावाला, बरसान्याला, भेट दिल्याखेरीज पूर्ण होत नाही. भर दुपारी तळपत्या उन्हात आम्ही सगळे बसने निघालोत. बरसाना हे राजस्थानात आहे. वृंदावनाच्या नैऋत्येला साधारण ३५ किमी वर. पण राजस्थानातल्या या गावी पोचलो तेव्हा वातावरण ब-यापैकी ढगाळ झालेले होते. साधारणतः एका टेकडीवर हा श्रीराधारानीचा महाल आहे. आपल्या बसेस खालीच ठेवून इथल्या वाहनांनी ती अरूंद चढण चढावी लागते. हौशी आणि आत्यंतिक भाविक मंडळींसाठी पाय-या पण आहेत पण इथल्या उन्हाचा गेले दोन तीन दिवस चांगलाच अनुभव घेतल्याने आमच्यापैकी कुणीही तशी इच्छा प्रगट केली नाही.

गड चढून वर गेलो मात्र सगळा शीण विसरायला लावणारा अप्रतिम वास्तुकलेतला नमुना बघायला मिळाला. संपूर्ण राजवाडा हा एक उत्तम वास्तुचा नमुना आहे हे जाणवले. श्री राधेचे हे मंदीर आणि राजवाडा पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकरांनी बांधलेला आहे. इथले लोक मोठ्या अभिमानाने बरसाना ही व्रजभूमीची राजधानी असल्याचे सांगतात. ते खरेही आहे. वृंदावनातले दैन्य इथे दृष्टीला पडत नाही. सगळे ऋषी, साधू, महात्मे आणि योगी पुरूष जन्मभर ज्याच्या प्राप्तीसाठी तळमळतात, तो बांके बिहारी श्रीराधे साठी वृंदावनावरून इथे येतो. श्रीराधा ही श्रीकृष्णाचे अंतःस्थ प्राण आहे याचा प्रत्यय इथे येतो. सर्वत्र प्रसन्नता अनुभवायला येत असते.








या राजवाड्याच्या सर्वच भिंतींवर श्रीकृष्णचरित्रातील काही छान प्रसंग रेखाटले आहेत. जवळपास ३०० वर्षांनंतरही त्यातले रंग आणि ते प्रसंग आपल्याला मोहवून टाकतात. त्यात भर म्हणजे हे प्रसंग आपल्या व्रज भाषेत अधिक खुलवून रसाळ करणारे एक पंडित आम्हाला गाईड म्हणून लाभले होते. सर्वांनी तिथे छान फ़ेर धरला, फ़ुगड्या खेळल्यात, भजने सुरू झालीत. श्रीराधा आणि बांके बिहारी आम्हाला मोहवून गेलेत, नश्वर जगाचा विसर पाडून गेलेत.






वृंदावनात  राधेच वर्णन श्रीराधा असेच करतात . ही असली नाममुद्रा सर्वत्र, जवळपास सर्वच घरांवर दिसते.




ऐन उन्हाळ्यातल्या दुपारी निष्पर्ण वृक्षावरील पोपटांचा थवा .


व्रज भूमी चे वैशिष्टय असलेले हे मोर . यांचा वावर सर्वत्र  आणि सहज असतो.


आपल्याकडे मे महिन्याच्या सुरुवातीला येणारा आंबा उत्तर भारतात मे महिन्याच्या शेवटी शेवटी येतो.





श्री कृष्णाला प्रिय असलेली तुलसी आणि  तेव्हढेच सुरेख वृंदावन.



इथली नाजूक कलाकुसर पाहून तर आम्ही थक्कच झालोत. अप्रतिम !


श्रीराधा राणीच्या महालातून दिसणारे बरसाना गाव. इथली "लठमार" होळी प्रसिध्द आहे.


संपूर्ण  सहलीत उत्साह टिकवून ठेवणारा आमच्यां तरूण मंडळींचा हा ग्रुप. 


सहलीचे को मेनेजर: श्री. वैभव  गोसावी. यांच्या विशेष टिप्पण्या सहलीत रंग भरायाच्यात.


आमचे सी. ई. ओ. कौस्तुभ खातखेडकर. एम.बी.ए.ची डिग्री घेण्याची यांना काहीच गरज नाही. अगदी लहान वयातच मोठमोठे कार्यक्रम यशस्वीरीत्या कसे आयोजित करावेत याच प्रशिक्षण ते कुठून तरी आधीच मिळवून आलेले  आहेत.






प्रत्यक्ष भागवतकार भगवान वेदव्यासांना ज्या रासक्रीडे ची भूल पडली ती रासक्रीडा चित्रांमध्ये. ही चित्रे कमीत कमी ३०० वर्षे आधी चितारली गेली आहेत.
















बरसाना येथील पौराणिक होळी. सब तो उस्सीके रंग मी रंग गयी हैं. उसे क्यो रंगा रही है  ?


मध्ययुगीन काळातील नागर वैभव. चित्रकाराची गोकुळ मथुरेची कल्पना.


कृष्णकथा आपल्या रसाळ व्रजबोलीत ऐकवणारा तिथला गाईड.








गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. (खट्याळ बाललीला) 











वृंदावनी वेणू कवणाचा माये वाजे?












आहे की नाही गम्मत ? कृष्णभूमीत "बरसाना" कधीही चुकवू नका.


No comments:

Post a Comment