Friday, December 22, 2017

संस्कृत सुभाषिते - ९ (घर की मुर्गी ....)

"अतीपरिचयाद्वज्ञा, संतत गमनादनादरो भवती
मलये भिल्ल पुरंध्री, चंदनतरूकाष्ठमिंधनम कुरूते"

अती परिचयामुळे अनादर आणि उपेक्षा होते. (नेहेमीच्या व निकट परिचयामुळे समोरच्या माणसाला गृहीत धरले गेल्यामुळे तर असे होत नसेल ?)
नेहेमी नेहेमी गेल्याने अनादर होतो. (शाळा आणि नोकरीधंद्याच्या ठिकाणी मात्र नेहेमी जाणे आवश्यकच आहे,)
याच उदाहरण म्हणजे मलय पर्वतावरच्या (ज्या ठिकाणी खूप चंदनाची झाडे आजुबाजूला आहेत, त्यांचा निकट परिचय आहे त्याठिकाणच्या) भिल्ल महिला चंदनतरूंचा वापर सरपण, इंधन म्हणून करतात.

आपण उर्दूतला "घरकी मुर्गी दाल बराबर" वाक्प्रचार नेहेमी वापरतो पण त्याआधी कित्येक वर्षे आपल्याच संस्कृत भाषेतले हे याच अर्थाचे सुभाषित आपल्याला आठवतही नाही म्हणजे आपण संस्कृत भाषेला "घरकी मुर्गी..." चीच वागणूक देतोय. खरे ना ?

No comments:

Post a Comment