Monday, September 7, 2026

आनंदाने जगायचं नाकारणं यासारखा दुसरा शाप नाही

पु. ल. देशपांड्यांनी वर्णन केल्याप्रमाणे आम्ही म्हणजे रोज दुपारचा आणि (संध्याकाळचाही) ताकभात उरकून हातावरचे पाणी वाळायच्या आत निद्रादेवीच्या राज्यात सामील होणारे वीर.  पत्रिकेच्या सुखस्थानी गुरू असला की असली सुखे लाभतात असे म्हणतात.  टचवुड. ते जाऊ देत बापडे.


रोज कामधंद्यावर दुपारच्या वामकुक्षीची होणारी पंचाईत सुट्यांच्या दिवशी भरून काढण्याच्या दृष्टीने आमची कायम वाटचाल असते. कधीकधी दुपारी साधारण चांगल्या चार पाच  घटिका वामकुक्षी पार पाडल्यानंतर उठताना घड्याळाकडे बघून क्षणभर अपराधी वाटतही, नाही असे नाही.


पण लगेच पाडगावकरांची "खरं सांगतो यात काही पाप नाही.आनंदाने जगायचं नाकारणं यासारखा दुसरा शाप नाही" या ओळी आठवतात. आणि आपणच आपल्या मनाची समजूत घालतो. आणि या तात्पुरत्या अपराधगंडातून बाहेर येतो.


- खरेतर "आयत्यावेळी आपल्या समर्थनार्थ अगदी convincing अशी योग्य ती वाक्ये, योग्य त्या कवितांच्या ओळी सुचणे यासारखे खरे सुख नाही" असे मानणारा, प्रा. वैभवीराम प्रकाश किन्हीकर. 

No comments:

Post a Comment