Sunday, August 21, 2022

देवाचिये द्वारी - ४३

 


जयास अहंकार नसे I नैराशता विलसे I

जयापासी कृपा वसे I तो सत्वगुण II

 

सकळांसी नम्र बोले I मर्यादा धरून चाले I

सर्व जन तोषविले I तो सत्वगुण II

 

सकळ जनांसी आर्जव I नाही विरोधासी ठाव I

परोपकारी वेची जीव I तो सत्वगुण II

 

आपकार्याहून जीवी I परकार्य सिद्धी करावी I

मरोन कीर्ती उरवावी I तो सत्वगुण II

 

 

सगळ्यांशी आर्जवाने आणि नम्र बोलणारा, अहंकारी नसलेला, ज्याच्याजवळ नैराश्याचे विचार नाहीत असा सत्वगुणी मनुष्यमात्र अजातशत्रू नसला तरच नवल. आपल्या जीवनकार्याला आपल्या जीवनाहून श्रेष्ठ बनवावे म्हणजे आपले लौकिक जीवन संपल्यावरही आपली कीर्ती या जगात शिल्लक राहते (Larger Than Life) अशा पद्धतीच्या सात्विक जीवनाचे सर्वसामान्य मनुष्यांनी आचरण करावे ही श्रीसमर्थांची आंतरिक इच्छा आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण कृष्ण दशमी, शके १९४४ , दिनांक २१/०८/२०२२)


No comments:

Post a Comment