Friday, August 5, 2022

देवाचिये द्वारी - २७

 



सर्व सुख गोडी साही शास्त्र निवडी I

रिकामा अर्धघडी राहू नको II


लटिका व्यवहार सर्व हा संसार I

वाया येरझार हरीविण II


नाममंत्र जप कोटी जाईल पाप I

रामकृष्णी संकल्प धरूनी राहे II


निजवृत्ती हे काढी सर्व माया तोडी I

इंद्रिया सवडी लपू नको II


तीर्थी व्रती भाव धरी रे करूणा I

शांती दया पाहुणा हरी करी II


ज्ञानदेवा प्रमाण निवृत्तीदेवी ज्ञान I

समाधी संजीवन हरिपाठ. II



या संसारातल्या सर्व लटक्या व्यवहारांचे फ़ोलपण जाणून, इंद्रियांच्या अधीन न होता, नामसाधनात जे कुणी साधक राहतील त्यांच्या घरी शांति आणि दया हे सदगुण कायम वास्तव्यास येतील. हरिपाठातले शेवटले काही अभंग लिहीताना माऊली आपले नामसाधनेचे प्रतिपादन अधिक आग्रहाने आणि अधिक भावपूर्ण करताना दिसत आहेत.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण शुद्ध अष्टमी, शके १९४४ , दिनांक ०५/०८/२०२२)

No comments:

Post a Comment