Thursday, August 25, 2022

देवाचिये द्वारी - ४७

 


जन्म दुःखाचा अंकुर I जन्म शोकाचा सागर I

जन्म भयाचा डोंगर I चळेना ऐसा II

 

जन्म कुविद्येचे फ़ळ I जन्म लोभाचे कमळ I

जन्म भ्रांतीचे पडळ I ज्ञानहीन II

 

जन्म जीवाचे मीपण I जन्म अहंतेचा गुण I

जन्म हेचि विस्मरण I ईश्वराचे II

 

आपण सगळे जण जन्माचा आनंद आणि मृत्यूचे दुःख करतो पण श्रीसमर्थांसारख्या विरक्त, विरागी पुरूषाने प्रत्येक जन्म हेच नवनवे कर्माचे आणि कर्मानुलेपनाचे आणि त्याद्वारे होत राहणा-या वारंवार जन्ममरणाच्या दुःखाचे कारण आहे हे प्रतिपादन करून जन्म कसा आहे याचे सविस्तर विवरण केलेले आहे. या जन्मात येऊन जर ईश्वराचे विस्मरण झाले, आपल्या मीपणाचेच, देहाचेच जर चिंतन झाले तर त्या मनुष्याचा जन्म हेच एक मोठे दुःख आहे हे श्रीसमर्थांना येथे सांगावयाचे आहे. 

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण कृष्ण त्रयोदशी, शके १९४४ , दिनांक २५/०८/२०२२)


No comments:

Post a Comment