Monday, August 29, 2022

देवाचिये द्वारी - ५१


 

बहुतेक आवर्ती पडिले I प्राणी वाहातचि गेले I

जे हि भगवंतासी बोभाईले I भावार्थबळे II

 

देव आपण घालून उडी I तयासी नेले पैलथडी I

येर ते अभाविक बापुडी I वाहातचि गेली II

 

भगवंत भावाचा भुकेला I भावार्थ देखोन भुलला I

संकटी पावे भाविकाला I रक्षितसे II

 

सतत जनन आणि मरण या प्रवाहात सर्वसामान्य प्राणी वाहतच जातात पण मनातल्या शुद्ध भावाने जे भाविक भगवंताला आळवतात त्यांच्यासाठी भगवंत स्वतः त्या प्रवाहात उडी घालून त्या भाविकाला जन्म मरणाच्या फ़े-यातून मुक्त करतात. भगवंत हा केवळ भावाचा भुकेला आहे हे श्रीसमर्थ या वैराग्यनिरूपण नावाच्या समासात प्रतिपादन करताहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(भाद्रपद शुद्ध द्वितीया, शके १९४४ , दिनांक २९/०८/२०२२)

No comments:

Post a Comment