Saturday, August 27, 2022

देवाचिये द्वारी - ४९

 


गर्भी म्हणे सोहं सोहं I बाहेरी पडता म्हणे कोहं I

ऐसा कष्टी जाहला बहु I गर्भवासी II

 

दुःखा वरपडा होता जाला I थोरा कष्टी बाहेर आला I

सवेंच कष्ट विसरला I गर्भवासाचे II

 

सुंन्याकार जाली वृत्ती I काही आठवेना चित्ती I

अज्ञाने पडली भ्रांति I तेणे सुखचि मानिले II

 

देह विकार पावले I सुखदुःखे झळंबले I

असो ऐसे गुंडाळले I मायाजाळी II

 

प्रत्येक जीव गर्भात असेपर्यंत त्याला स्वतःच्या स्वरूपाचे, स्वतःच्या आणि परमेश्वराच्या एकरूपतेचे ज्ञान असते. "सोहम" (मीच तो) हा त्याचा विचार आणि उदगार असतो. पण एकदा आईच्या गर्भातून तो जीव बाहेरच्या जगात आला की त्यावर जगाचा परिणाम होऊन तो आपले मूळ स्वरूप विसरून जातो आणि "कोहम" (कोण बरे मी ?) या भ्रांतीत पडतो. गर्भावस्थेतला पूर्ण जीव या जगात आल्यानंतर अपूर्णत्व पावतो. त्याला पूर्वजन्मीचे ज्ञान, या जन्माचे प्रयोजन काहीही आठवत नाही. या जगाला, या जगातल्या देहस्वरूपी अज्ञानालाच तो सुख मानतो आणि काम क्रोधादि विकारांनी गुंडाळले की या माया चक्रात अडकून जातो.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण अमावास्या, पोळा, शके १९४४ , दिनांक २७/०८/२०२२)


No comments:

Post a Comment