Saturday, August 20, 2022

देवाचिये द्वारी - ४२

 


जो परमार्थाचे मंडण I जो महंतांचे भूषण I

रजतमाचे निरसन I जयाचेनि II

 

जो परम सुखकारी I जो आनंदाची लहरी I

देऊनिया निवारी I जन्ममृत्यू II

 

जो अज्ञानाचा शेवट I जे पुण्याचे मूळ पीठ I

जयाचेनि सापडे वाट I परलोकाची II

 

रजोगुण, तमोगुणाचे वर्णन केल्यानंतर श्रीसमर्थ दुस-या दशकाच्या सातव्या समासात सत्वगुणाचे महत्व निवेदन करताहेत. ज्याने रजोगुण आणि तमोगुणांचे निरसन होते, जो अत्यंत सुखकारक असून मनुष्यमात्राला ख-या आनंदाचा लाभ करून देतो आणि जन्म मरणाच्या फ़े-यातून मुक्त करवितो, जो पुण्याचे मूळ असून ज्यामुळे अज्ञानाचा नाश होऊन आपल्याला ख-या अध्यात्माची वाट सापडते असा हा सत्वगुण श्रीसमर्थ वर्णन करताहेत.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(श्रावण कृष्ण नवमी, शके १९४४ , दिनांक २०/०८/२०२२)


No comments:

Post a Comment