बरोबर १० वर्षांपूर्वीचा प्रवास. ठाण्यावरून शिरपूरसाठी आम्ही कुटुंब सकाळी निघालो. संध्याकाळपर्यंत शिरपूरला पोहोचलो असतो तरी चालले असते.
३५० किमी पूर्ण प्रवास हा चारपदरी असलेल्या मुंबई - आग्रा महामार्गाने होणार होता. ३५० किमी प्रवासाला फार तर ६ तास लागले असते म्हणून आम्ही अधिकच रमत गमत निघालो होतो.
शहापूरच्या जवळ भरपेट नाश्त्यासाठी तबियतीने थांबणे, थळ घाटात (कसारा घाटात) थांबून जिथे जिथे रेल्वेमार्ग रस्त्याखालील बोगद्यांमधून पसार होतात, तिथले फोटो काढणे वगैरे रेलफॅनिंग सुरूच होते.
इगतपुरीनंतर घोटीजवळ रस्ता आणि रेल्वेमार्ग अगदी एकमेकांजवळून जातात. तिथे रेल्वेमार्गावर इंग्रजी S आकाराचे वळण आहे. रस्त्याच्या कडेला गाडी तबियतीत थांबवली आणि एक छोटे टेकाड ओलांडून साधारण अर्धा तास रेल्वेफॅनिंग केले.
माझ्या या प्रेयसीने मला निराश केले नाही. मुंबई - भुसावळ पॅसेंजर नाशिककडे गेली, भुवनेश्वर - लोकमान्य टिळक टर्मिनस सुपर एक्सप्रेस मुंबईकडे गेली. तोच हा व्हिडीओ.
- प्रवास म्हणजे केवळ एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाणे नव्हे तर मार्ग पूर्णपणे अनुभवत, आनंद घेत जाणे यातच खरे प्रवासाचे आणि जीवनाचेही इंगित आहे असे समजणारा, प्रवासी पक्षी, वैभवीराम.