Tuesday, August 11, 2020

लग्नसमारंभ : एक चिंतन.

 एक समाजघटक म्हणून न वागता , आपण किती आत्मकेंद्री झालो आहोत हे पडताळायचे असेल तर आजकालच्या कुठल्याही लग्न समारंभात जावे.

नवरदेव, नवरी मुलगी आणि गिने चुने, जवळचे नातेवाईक सोडले तर झाडून सगळ्यांना त्या कार्यक्रमात काहीच इंटरेस्ट नसतो. जो तो आपला "ह्यात" असतो.
पूर्वी (म्हणजे साधारण ३० वर्षांपूर्वी) लग्नात किमान १०० तरी नातेवाईक, पाहुणे राहुणे मंडळी कामाला, मदतीला असायची. फक्त त्यांच्याच जेवणाखाण्याची आणि मुलाकडल्या वर्हाड्यांची जेवणाखाण्याची व्यवस्था लग्नात करावी लागत असे.
शहरातच राहणार्या, लग्न लावायला येणार्या इतर परिचितांची, लग्नाआधी लाल कागदात गुंडाळलेला पेढा आणि लग्नानंतर लाडू चिवड्याचे पाकिट देऊन बोळवण केली जात असे. आॅफिस वगैरेची घाई असणारे परिचित या पध्दतीत अपमान वगैरे मानीत नसत.
आजकाल तर सर्व वर्हाडी मंडळी लग्न (एकदाचे) लागले रे लागले की ब्युफेकडे "आक्रमण" करतात आणि आपल्या कामाचा मार्ग धरतात. लग्नातल्या इतर कार्यक्रमांशी निकटचे कुणी सोडले तर कुणालाही रस नसतो.
करोनानंतरच्या साजर्या होणार्या लग्नसमारंभांमधे सर्वत्रच हा जुना पॅटर्न (अपरिहार्य म्हणून का होईना) नक्की रूजायला हवाय.
- अगदी जवळच्याच लग्न समारंभात सहभागी होणारा, बुजरा, प्रा. राम.

No comments:

Post a Comment