Sunday, July 25, 2021

Theorem of relationship inside a family.

 माझे एक प्रमेय आहे.

१ % अपवाद असतीलही पण ९९ % वेळा हे प्रमेय खरे ठरलेय. कारण त्यामागचे निरीक्षण तटस्थ व प्रामाणिक आहे.
प्रमेय:
"पाठच्या दोन भावांच्या लग्नांमधले अंतर जेव्हढे जास्त असेल, तितके त्या दोन जावांमधले नाते घट्ट असते."
असे का ? या निरीक्षणाचे मी विश्लेषण केले आणि यामागील (मनो)शास्त्रीय कारणांचा शोध लागला की.
थोरल्याचे लग्न झाले की धाकटा दीर आणि वहिनी यांच्यात 'थोरली बहीण धाकटा भाऊ' किंवा 'आई - मुलगा' हे बंध नैसर्गिकरित्या निर्माण व्हायला थोडा काळ जाऊ द्यावा लागतो. ही नाती निर्माण होण्याचा तो काळ मिळण्यापूर्वीच धाकट्याचे लग्न झाले की मग जावाजावांमध्ये एक बरोबरी होते आणि घरात एक अकारण स्पर्धात्मक वातावरण निर्माण होते.
वर म्हटल्याप्रमाणे या प्रमेयाला अपवाद आहेत. दोघांच्या लग्नात बरीच वर्षे अंतर असूनही दोन जावांमध्ये स्पर्धा असणे किंवा दोघा भावंडांच्या लग्नात फार कमी अंतर असूनही भावजई - दीराचे आई लेकराचे नाते निर्माण होणे.
पण हे अपवाद अगदी १ %. शिवाय नियम हा अपवादानेच सिध्द होतो ना ?
- माणसांमधील, कुटुंबांमधील आंतर्संबंधांचा त्रयस्थ अभ्यासक आणि तटस्थ निरीक्षक आणि "सर्वे भवन्तु सुखिनः" ही वृत्ती कायमच हृदयात जोपासणारा, माणूस, प्रा. राम किन्हीकर

No comments:

Post a Comment