Monday, October 24, 2022

देवाचिये द्वारी - १०७

 


जनाचा लालची स्वभाव I आरंभीच म्हणती देव I

म्हणिजे मला काही देव I ऐसी वासना II


कष्टेवीण फ़ळ नाही I कष्टेवीण राज्य नाही I

केल्यावीण होत नाही I साध्य जनी II


मेळविती तितुके भक्षिती I ते कठीण काळी मरोन जाती I

दीर्घ सूचनेनें वर्तती I तेंचि भले II



श्रीसमर्थांनी सर्वसामान्य नाणसांना जीवनात आणि अध्यात्मात कुठेही अकर्मण्यता सांगितलेली नाही. सर्वसामान्य माणसांनी दीर्घ दृष्टीने विचार करून थोडी तरी बचत करीत जावी म्हणजे ती त्यांच्या कठीण काळात ती कामाला येईल हा स्पष्ट उपदेश आजकालचे अर्थशास्त्रज्ञ करतात तो उपदेश श्रीसमर्थांनी चारशे वर्षांपूर्वीच आपल्याला श्रीमददासबोधातून करून ठेवलेला आहे.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन कृष्ण चतुर्दशी / आश्विन अमावास्या, नरकचतुर्दशी / लक्ष्मीपूजन शके १९४४ , दिनांक २४/१०/२०२२)


No comments:

Post a Comment