Tuesday, October 11, 2022

देवाचिये द्वारी - ९४

 


आळस उदास नागवणा I आळस प्रेत्नबुडवणा I

आळसे करंटेपणाच्या खुणा I प्रगट होती II

 

म्हणौन आळस नसावा I तरीच पाविजे वैभवा I

अरत्री परती जीवा I समाधान II

 

प्रत्येक मनुष्याचे परलोकीचे जीवन तर सुखकर व्हावेच पण इहलोकी वावरतानाही त्याने सुखी व्हावे असे श्रीसमर्थांना मनापासून वाटते. म्हणून ग्रंथराज श्रीमददासबोधाच्या अकराव्या दशकाच्या सिकवणनिरूपण नामक तिस-या समासात त्यांनी आपणा सर्वांना आळस त्यागण्याची शिकवण दिलेली आहे.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन कृष्ण द्वितीया शके १९४४ , दिनांक ११/१०/२०२२)


No comments:

Post a Comment