Friday, October 28, 2022

देवाचिये द्वारी - १११

 


राखावी बहुतांची अंतरे I भाग्य येते तदनंतरे I

ऐसी हें विवेकाची उत्तरे I ऐकणार नाही II


कांही नेमकेंपण आपुलें I बहुत जनासी कळों आलें I

तेंचि मनुष्य मान्य जालें I भूमंडळी II


याकारणें अवगुण त्यागावे I उत्तम गुण समजोन घ्यावे I

तेणे मनासारिखे फ़ावें I सकळ कांही II



आपले काही वेगळेपण, नेमकेपण जगाच्या लक्षात आल्याशिवाय जग आपल्याला मान्यता देणार नाही. यासाठी सर्वसामान्य साधकांनी अवगुण टाकून देऊन सदगुण अंगी बाणवून खूप लोकांना प्रिय होण्यासाठी विवेकाने प्रयत्न केले पाहिजेत असे श्रीसमर्थांना वाटते.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(कार्तिक शुद्ध तृतीया शके १९४४ , दिनांक २८/१०/२०२२)


No comments:

Post a Comment