Sunday, October 30, 2022

देवाचिये द्वारी - ११३

 


ज्यासी उपाधी आवरेना I तेणे उपाधी वाढवावीना I

सावचित्त करूनिया मना I समाधाने असावे II


लोक बहुत कष्टी जाला I आपणहि अत्यंत त्रासला I

वेर्थचि केला गल्बला I कायसासी II


ज्या साधकाला आपण केलेल्या कार्याची उपाधी कशी आवरावी ? हे कळत नाही त्याने उपाधी वाढवूच नये असे श्रीसमर्थांना वाटते. अशी उपाधी न आवरता येता वाढवली तर लोकही कष्ती होतील आणि साधकही त्रासून जाईल आणि मुख्य कार्य मागे पडेल.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(कार्तिक शुद्ध षष्ठी शके १९४४ , दिनांक ३०/१०/२०२२)


No comments:

Post a Comment