Monday, October 31, 2022

देवाचिये द्वारी - ११४

 


नष्टासी नष्ट योजावे I वाचाळासी वाचाळ आणावे I

आपणावरी विकल्पाचे गोवे I पडोंच नेदी II


कांटीने कांटी झाडावी I झाडावी परी ते कळों नेदावी I

कळकटेपणची पदवी I असो द्यावी II


न कळता करी कार्य जें ते I ते काम तत्काळचि होते I

गचगचेत पडतां तें I चमत्कारे नव्हे II


समाजात मोठे कार्य करताना दुष्ट दुर्जन लोकांचे मन वळवून, त्यांना संपूर्ण नष्ट न करता आपल्यासोबत बाळगावे आणि दुस-या दुष्टांशी लढताना त्यांचा वापर करावा. आपल्या कार्याचा फ़ार गवगवा करू नये आणि आपण मात्र बाह्य वेषाने साधे, क्वचित गबाळे असावे म्हणजे कुणाला आपल्या महान कार्याचा फ़ार मागमूस लागू देऊ नये असे श्रीसमर्थांचे आग्रही प्रतिपादन आहे.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(कार्तिक शुद्ध सप्तमी शके १९४४ , दिनांक ३१/१०/२०२२)


No comments:

Post a Comment