Tuesday, October 25, 2022

देवाचिये द्वारी - १०८

 


ऐसा ग्रंथ जपोनी ल्याहावा I प्राणीमात्रांस उपजे हेंवा I

ऐसा पुरूष तो पहावा I म्हणती लोक II


काया बहुत कष्टवावी I उत्कट कीर्ती उरवावी I

चटक लावूनी सोडावी I कांही येक II


ग्रंथलेखन कसे करावे, समास किती सोडावा याबद्दल श्रीमददासबोधाच्या १९ व्या दशकाच्या पहिल्या समासात श्रीसमर्थांनी मार्गदर्शन केलेले आहे. इतका सुंदर ग्रंथ लिहावा की सगळ्या लोकांना त्या ग्रंथकर्त्याला भेटण्याची ओढ लागायला हवी असे श्रीसमर्थांना वाटते. समजात काही विशेष काम करू इच्छिणा-या मनुष्यमात्रांनी आपले शरीर कष्टवून आपल्या इहलोकातून प्रयाणानंतरही आपली कीर्ती कायम राहील असे कार्य करून जावे.


II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

II जयजय रघुवीर समर्थ II


- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन अमावास्या शके १९४४ , दिनांक २५/१०/२०२२)


No comments:

Post a Comment