Friday, October 21, 2022

देवाचिये द्वारी - १०४

 


अवगुण अवघेचि सांडावे I उत्तम गुण अभ्यासावे I

प्रबंद पाठ करीत जावे I जाड अर्थ II

 

पाठ उदंडचि असावे I सर्वकाळ उजळीत जावे I

सांगितले गोष्टींचे असावे I स्मरण अंतरी II

 

अखंड येकांत सेवावा I ग्रंथमात्र धांडोळावा I

प्रचित येईल तो घ्यावा I अर्थ मनी II

 

 साधकांनी उत्तम गुणांचा ध्यास धरून अवगुणांचा त्याग करावा. त्यासाठी त्यांचे भरपूर पाठांतर आणि ठराविक कालावधीने पाठांतराची उजळणी असावी. भरपूर वाचन झाले तरी स्वतःला जी प्रचिती आली तो त्या वाचनाचा अर्थ आणि अनुभव मनी ठसवावा असे श्रीसमर्थांना वाटते.

 

II निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम II

 II जयजय रघुवीर समर्थ II

 

- प्रा. राम प्रकाश किन्हीकर

(आश्विन कृष्ण एकादशी / द्वादशी, रमा एकादशी / वसुबारस शके १९४४ , दिनांक २१/१०/२०२२)


No comments:

Post a Comment