Tuesday, July 14, 2020

आठवणींचा हिंदोळा

निवांत बसलेलो असताना कुठल्या वेळी काय आठवेल ? याचा नेम नाही.
आज असाच निवांत असताना आम्ही सांगोल्यात घालवलेली वर्षे आठवली. महिन्याभराच्या किराणा आणि इतर खरेदीसाठी महिन्यातून एकदा तरी सोलापूर किंवा सांगलीची फेरी व्हायचीच.
सांगलीत विश्रामबागेतल्या दांडेकरांच्या किराणा मॉलमध्ये काऊंटरवर पापडाच्या लाट्या ठेवलेल्या असायच्यात. किराणा घेऊन बिल देताना सगळ्यात शेवटी त्यांची खरेदी व्हायचीच. आणि सांगोल्यापर्यंतच्या दीड पावणेदोन तासांच्या प्रवासातच त्यांचा फडशा पडायचा. बालपणी आई, मावशी, आजी पापड लाटत असताना आत शिरून "नको नको" चा धोशा असताना पळवून खाल्लेल्या लाट्यांची आठवण दाटून यायची.
एका आठवणीतून दुसरी, दुसरीतून तिसरी.... मनाचा आवाका आणि ताकद किती विचित्र आणि प्रचंड आहे, नाही ?

- पापड लाट्यांच्या नॉस्टाल्जियात रमणारा, राम.


No comments:

Post a Comment