Wednesday, July 15, 2020

काल आणि आज. कोण होतो आम्ही ? काय झालो आम्ही ?

भोजनानंतर किंवा कुठल्याही अल्पोपहारानंतर (शुध्द भाषेत नाश्त्यानंतर) मुखारोग्यासाठी अत्यंत शास्त्रीय आणि उपयुक्त
उत्तराषोषणम (आपोष्णी घेणे),
हस्तप्रक्षालनम (हात धुणे),
मुखप्रक्षालनम (तोंड धुणे - खळखळून चूळ भरणे),
आचमनीयम (आचमन करणे),
या अशा सगळ्या क्रिया आपण पूजेपुरत्याच राहू दिल्यात.
प्रत्यक्षात मात्र कोमट लिंबूपाण्यात बोटे बुडवून (फिंगर बाऊल), तोंड कागदी नॅपकीनने पुसायला लागलो. या सर्व अशास्त्रीय प्रकाराला पाश्चात्यशरण दृष्टीकोनातून प्रतिष्ठेचे मानीत आलोत.
एकेकाळी पाहुण्यांना जेवणानंतर हात धूवून झाल्यावर, हाताला घासायला (कदाचित जेवणातल्या पदार्थांचा वास जावा म्हणून असेल) चंदनाची उटी देण्याइतपत आपण समृध्द होतो. (करोद्वर्तनार्थे चंदनम समर्पयामि)
आता मात्र संतूरच्या चंदन फ्लेवर्ड हँडवाॅशवर आपण समाधान मानतोय.
असो, कालाय तस्मै नमः.
- पूजाविधान प्रत्यक्ष जीवनात जगून जीवन समृध्द करू इच्छिणारा पुराणमतवादी, पुराणा रामभाऊ (डाॅ.मुरलीमनोहर जोशी समर्थक)


No comments:

Post a Comment