Tuesday, July 21, 2020

सुजाण पालक आणि परिक्षांचे निकाल.

वसंत कानेटकर लिखीत "प्रेमाच्या गावा जावे" या नाटकात मी दोन वेगवेगळ्या वर्षी दोन वेगवेगळ्या भूमिका केल्यात.
१९९१ मधे कराडला आमच्या काॅलेज गॅदरिंगमधे मी त्यात क्रिकेटर "टिटू" ची भूमिका केली होती. आमचा तत्कालीन सिनीयर आणि आज मराठी रंगभूमी व चित्रपटसृष्टीतला एक संवेदनशील लेखक, दिग्दर्शक, अभिनेता संदेश कुलकर्णी माझ्या आजोबांच्या (बिंदुमाधव सरनोबत) भूमिकेत होता.


गंमत म्हणजे ४ च वर्षांनी धामणगावला नोकरी करीत असताना, "शब्दरंग" संस्थेतर्फे हे नाटक पुन्हा सादर झाले. डाॅ. आनंद सुभेदारांनी दिग्दर्शित केलेल्या या प्रयोगात मी माझ्याच मागील भूमिकेच्या वडिलांची (चिंतामणी बिंदुमाधव सरनोबत, टिटूचे बाबा) भूमिका साकारली होती. या दोन्हीही भूमिका मी खूप एँजाॅय केल्या होत्या.
या नाटकातला आजोबांचा आपल्या मुलाशी झालेला एक संवाद माझ्या अगदी काळजावर कोरल्या गेला आहे.
"अरे, चिंतामणी, अभ्यासाबद्दल मुलांचे कान कधी उपटायचे ? परीक्षेच्या निकालानंतर ?
कधीच नाही.
जे काय कान उपटायचे ते परीक्षेच्या तयारीवेळी. परीक्षेच्या निकालानंतर फक्त मुलांच्या पाठीवर हात,
शाबासकीसाठी नाहीतर धीर देण्यासाठी."
सगळ्या सुजाण पालकांसाठी महत्वाचा संदेश आहे, नाही ?
- "A teacher is a performing artist" या वचनावर श्रध्दा असलेला एक शिक्षक आणि एक सुजाण पालक


No comments:

Post a Comment