Wednesday, October 28, 2020

काही अति उपेक्षित वैदर्भिय फ़ळे आणि रानमेवा.

 ज्या फळाच्या आठोळीतून चारोळ्या मिळतात ती "चारं" (यातल्या "च" चा उच्चार "चूल" शब्दासारखा),

जांभळ्या पातळ आवरणाच्या आंबडगोड "एरोण्या"
आणि
गरीबांचे चिक्कू म्हणून ओळखले जाणारे "टेंभर" हे पदार्थ म्हणजे फक्त आग्नेय विदर्भाचीच मक्तेदारी आहे. (चंद्रपूर जिल्हा, यवतमाळ जिल्ह्याचा वणी, घाटंजी तालुका आणि थोडा किनवट तालुका)
बाकी आजकालच्या जागतिकीकरणाच्या नादात खुद्द चंद्रपुरातही हे पदार्थ दिसत नाहीत.
- "आता पुढच्याखेपी चांद्याले गेलो का नाई, त गोलबजारात जाऊन पहाच लागते मले, का कोठ गेले हे टेंभरं न त्या एरोन्या ?
हे मले सैनच नाई होऊन राह्यलं" म्हणत
Be Vocal for Local साठी झटणारा तुमच्या सगळ्यांचा "चैतू" राम.

No comments:

Post a Comment